
कार्तिकी एकादशिच्या जत्रेनंतर रत्नागिरी शहरात जमला ५० टन कचरा
रत्नागिरीतील कार्तिकी एकादशीची यावर्षीची जत्रा दणक्यात झाली. दरवर्षी एकादशीच्या विदशीच चालणारी ही जत्रा आदल्या दिवसापासूनच सुरू झाली. जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आले होते. रस्त्याच्या दुतर्फाच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध आणि गल्लीबोळातही दुकाने लावण्यात आली होती. त्यामुळे जत्रा संपल्यानंतर प्लास्टिक आणि खोक्यांच्या कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात जमला होता.
५०टन कचरा, नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी गोळा केला.रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात दरवर्षी कार्तिकी एकदशी साजरी होते. या निमित्ताने जत्रा भरते. स्थानिक दुकानदारांसह जिल्ह्याबाहेरील व्यावसायिक येतात. यावर्षी बाहेरून येणार्या व्यावसायिकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. ग्राहकांनीसुद्धा तुफान गर्दी केली होती.
बुधवारी सकाळी ६.३० वाजता जत्रेच्यावेळी जमलेला कचरा उचलण्याचे काम सुरू झाले. रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागाचे ३० सफाई कामगार, २ ट्रॅक्टर आणि २ कचरागाड्यांच्या मदतीने हे काम सुरूच होते. गेल्या वर्षी ४ ते ५ टनच कचरा जमा झाला होता. यावर्षी तो ४० ते ५० टनावर गेला असल्याचे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले. www.konkantoday.com