
उदय सामंत ह्यांचा ठाकरे गटाला धक्का; गावखडी चे सरपंच गौतम पाटील ह्यांचा शिवसेनेत प्रवेश !
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. उबाठा गटाचे रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावाचे सरपंच श्री. गौतम पाटील ह्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ह्या पक्षप्रवेशासमयी शिवसेना तालुकाप्रमुख बाबूशेठ म्हाप, जि. प. चे माजी अध्यक्ष आबा घोसाळे ह्यांच्यासह अन्य संबंधित उपस्थित होते.