
जे मातोश्रीचे झाले नाहीत ते तुमचे काय होणार -संजयराव कदम यांचा रामदास कदम यांना टोला.
रामदासभाईंना मातोश्रीने आमदारकी, मंत्रीपद, विरोधीपक्षनेते पद, विधान परिषद आमदारकी, मुलाला दापोलीची आमदारकी इतके देवूनही ते मातोश्रीचे होवू शकले नाहीत. बाळासाहेबांच्या कुटुंबावर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वेळोवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते टीका करत आहेत. सर्व देवूनही जे मातोश्रीचे होवू शकले नाहीत ते तुमचे आमचे काय होणार, असा सवाल उपस्थित करतानाच बाप बेट्यांना आता पुन्हा मुंबईला पाठविण्याची वेळ आली असल्याची खरमरीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार संजयराव कदम यांनी यावेळी येथील मेळाव्यात केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कुडावळे पंचायत समिती गणाचा मेळावा वेळवी रामवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. www.konkantoday.com