सायकल इव्हेंटमध्ये चिपळूणच्या गोखलेंची कौतुकास्पद कामगिरी

चिपळूणस्थित श्रीनिवास गोखले यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १००० कि.मी. सायकल इव्हेंटमध्ये (बीआरएम/एलआरएम) भाग घेत मोठे यश मिळवले. दिल्ली रंडोनिअर्सतर्फे आयोजित दिल्ली-अदारी बॉर्डर-दिल्ली ही १००० कि.मी. ची इव्हेंट गोखले यांनी निर्धारित ७५ तासांच्या वेळेत पूर्ण केली.स्वातंत्र्यदिनी सकाळी ५.०० वाजता ही इव्हेंट दिल्ली येथून सुरू होवून ऐतिहासिक अशा ग्रँड ट्रंक रोडवरून पानिपत-कर्नल -अंबाला -लुधियाना-फगवाडा -जालंधर ही शहरे घेत ५०० कि.मी. चे अंतर पार करून अट्टारी/वाघा बॉर्डर पंजाब येथे पोचली. नंतर त्याच मार्गावरून परत फिरून १७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे पूर्ण करण्यात आली. तीन दिवस सुमारे ९० टक्के आद्रता, दुपारच्या वेळेस भाजून काढणारे ऊन या नैसर्गिक आव्हानाला तोंड देत आणि त्यातही थोडी वाकडी वाट करून अटारी/वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, सुवर्ण मंदिर, चंदीगड, मोहाली, एरोसिटी यांना भेट देत गोखले यांनी १००० कि.मी. ऐवजी सुमारे १०२० कि.मी. अंतर ७१५ तासात पूर्ण केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button