विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने आपले सर्व उमेदवार विजयी केले शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता


विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहे आहेत. यात भाजपच्या पंकजा मुंडेसह भाजपच्या पाच उमेदवारांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यासह अजित पवार गटाचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचाही विजय झाला आहे. तर अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांचाही विजय झाला आहे. महायुतीने नऊ उमेदवार उभे केले होते ते उमेदवार विजयी झाले आहेत

आता ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, आणि जयंत पाटील यांच्यात पुढच्या फेरीत चुरस पाहायला मिळणार मिलिंद नार्वेकर यांना केवळ एका मताची विजयासाठी गरज आहे त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव अटळ दिसत आहे.

विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळं पराभवाचा धक्का नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button