
चिर्ले ते पत्रादेवी कोकण द्रूतगती मार्ग आणि रेवस ते रेडी सागरी महामार्गादरम्याने तीन नवनगरे
प्रस्तावित चिर्ले ते पत्रादेवी कोकण द्रूतगती मार्ग आणि रेवस ते रेडी सागरी महामार्गादरम्याने पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुुदुर्गमधील एकूण ४४९.८३ चौ. की. मी. क्षेत्रात १३ नवनगरे विकसित केली जाणार आहेत. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी तीन ठिकाणी ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरीत नवीन गणपतीपुळे, राजापूर तालुक्यातील आंबोळगड आणि दापोली तालुक्यातील देवके तर सिंधुदुर्गात मालवण, रेडी आणि नवीन देवगड ही ग्रोथ सेंटर असणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाच्यावतीने ही नवनगरे विकसित केली जाणार आहेत. राज्य शासनाने याबाबतची अधिसूचना १५ मार्च रोजी जाहीर केली आहे.नवीन गणपतीपुळे नगराचे एकूण क्षेत्र ५९.२८ चौ.की. मी. इतके निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये नेवरे, भगवतीनगर, गणपतीपुळे, धामणसे, भंडारपुळे, निवेंडी, ओरी, तळेकरवाडी आदी गावातील क्षेत्राचा समावेश आहे. राजापूर तालुक्यात आंबोळगड नवनगराचे एकूण क्षेत्र ५०.५ चौ. की. मी. असून त्यामध्ये भराडीन, वडतिवरे, पनेरे, नाटे, आंबोळगड, धाऊलवल्ली, भाबळेवाडी, पोकळेवडी, राजवाडी, दसुरेवाडी, साखरीनाटे, यशवंतगड, बांधवाडी आदी गावातील क्षेत्राचा समावेश आहे. www.konkantoday.com