विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगणे गरजेचे -कैलास लवेकर


गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळांनी मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, देखावे साकारताना अनधिकृतपणे वीज वापर करणे धोकादायक व जीवघेणे ठरू शकते. अशा वीज वापरामुळे व्यवस्थेवर ताण पडून शॉर्टसर्किट होवू शकते. यासाठी विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी सांगितले. मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह नजिकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्युत निरीक्षकांची विद्युत संच मांडणी परवानगी आवश्यक आहे. मात्र याबाबत जागृती दिसत नाही. अनधिकृतपणे वीज वापर करणे धोकादायक व जीवघेणे ठरू शकते. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे अपघात टाळळ्यासाठी मंडळांनी दक्षता, काळजी घेणे गरजेचे आहे. विद्युत वाहिन्यांखाली मंडप उभारताना ते विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येवू नयेत. विद्युत खांम, रोहित्रे, फिडर पिलरवर चढून कुठलेही काम करू नये. विद्युत संच मांडणी सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत संच मांडणीत अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर किंवा रेसिड्यूल करंट सर्कीट ब्रेकर बसवावे. विद्युत भारानुसार योग्य क्षमतेच्या वायर्स वापराव्यात. वायर्सचे इन्शुलेशन खराब होवून लोखंडी पत्र्यात उरेल, धोक्याचा व अँगलमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते. शक्यतो जोड वायर्स वापरणे टाळावे. वायर्सना जोड देण्याची गरज असल्यास योग्य क्षमतेची चिकट टेप वापरावी. थ्री पीनचा वापर करावा. उघड्या वायर्स खोचू नये. मंडपातील स्वीचबोर्ड सुरक्षित ठिकाणी ठेवावा. त्याच्या मागील बाजूस लाकडी फळी असावी. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button