चाकरमान्यांसाठी खूशखबर गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी यंदाही विशेष रेल्वे सोडण्यात येणार ,वाचा कीती विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार konkanrailway ganpatispecial trains

गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने चांगली बातमी दिली आहे
कोकणासाठी यंदाही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून त्याची घोषणा गुरुवारी कोकण रेल्वेने केली. सुरुवातीला १५० विशेष गाडया सोडण्यात येणार आहे. सर्वप्रथम ७२ त्यानंतर आणखी ४० ट्रिप्स आणि आता ३८ फेऱ्या वाढविण्यात येत आहेत असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जाहीर केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गणेशोत्सवानिमित्त यंदाही मुंबई व परिसरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी शासनाकडून विलगीकरण आणि करोना चाचणीची अट बंधनकारक केली जाऊ शकते.

Special trains to be run on konkanrailway route for ganeshchaturthi


गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकून १५० फेऱ्या होणार आहेत.यामध्ये मध्य रेल्वेने आधीच जाहीर केले आहे अशा ७२ फेऱ्या, त्यानंतर मध्य रेल्वेने जाहीर केलेली अतिरिक्त ट्रेनच्या ४० फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आत्ता ३८ फेऱ्या भारतीय रेल्वेच्या जाहीर केल्या असून, अश्या एकून १५० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. याचे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे.कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवासाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही. या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर आणखी सोय करण्यात येईल. असे मंत्री दानवे यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button