
अतिवृष्टीमुळे पाठ्यपुस्तक वितरणात परीणाम
कोरोनामुळे पुस्तकांची वेळेत छपाई न झाल्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळाली नव्हती. त्यात नैसर्गिक आपत्तीची भर पडली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाठ्यपुस्तक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील पुस्तकांपासून वंचित आहेत.
www.konkantoday.com