कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र असलेल्या मास्कचा ५० टक्के लोक योग्यपद्धतीने वापर करीत नाहीत

कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र कोणते असेल तर ते आहे मास्क. पण ५० टक्के लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करता दिसत नाहीत.एका रिपोर्टनुसार ६४ टक्के लोक चेहरा झाकतात पण नाकावर त्यांच्या मास्क नसतो. २० टक्के लोकांचा मास्क हा हनुवटीवर असतो. तर २ टक्के लोक मास्क मानेवर लावतात. केवळ १४ टक्के लोक असे आहेत ते नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात. जर तुम्ही मास्क लावताना अशी चूक करत असाल तर लगेच सुधारा. योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क लावा.
नाक व तोंडावाटेच कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करत असतो. त्यामुळे मास्कचा वापर केल्यास संसर्गापासून दूर राहता येणे शक्य आहे. त्यासाठी मास्क सर्जिकल अथवा N-95 असल्यास अधिक चांगले. कोरोनाचा नव्हे तर दमा, धुळीची अ‍ॅलर्जी यापासूनही बचाव होतो. हवेतून होणारा संसर्ग टाळता येतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button