वीज वाहिनीच्या भूमिगत कामामुळे शिरगाव भागात माती रस्त्यावर अनेक रस्ते बंद ,ग्रामस्थ संतप्त

रत्नागिरी जवळील शिरगाव येथे गेल्या काही दिवसांपासून भूमिगत विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे तसेच वीज विभागाच्या अधिकार्‍याचे दुर्लक्ष व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे भूमिगत वीजवाहिनीच्या चराच्या खोदाईमुळे शिरगाव मारुती मंदिर परिसरात सर्व माती रस्त्यावर आल्याने मातीचे ढीग रस्त्यावर आले त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले तर मातीचा ढीग डांबरी रस्त्यावर आल्याने रस्ते बंद पडले त्यामुळे शिरगाव परिसरातील तीन चारशे संतप्त नागरिक एकत्र आले त्यांनी कंत्राटदार व त्यांच्या कामगारांना धारेवर धरले चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाला असून सध्यावफक्त काही भागात विद्युत पुरवठा सुरू झाला आहे तसेच वादळामुळे नळपाणी योजनेचे पाइप तुटुन गेल्याने पाणीही उपलब्ध होत नसल्याने नागरिक आधीच संतप्त झाले होते त्यातच वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या संतापाची भावना निर्माण झाली काही संतप्त ग्रामस्थ वीज कंत्राटदारांच्या कामगारांवर धावून गेले होते मात्र अनेकांनी मध्यस्थी केल्याने हा गंभीर प्रसंग टळला शिरगाव परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम विभागून वेगवेगळ्या कंत्राटदारांना दिले आहे मात्र कामावर कंत्राटदार व वीज मंडळाच्या अधिकारी यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने हे काम वेगवेगळ्या पध्दतीने केले जात आहे भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामांबाबत ग्रामपंचायतीने पूर्वी आक्षेप घेतला हाेता ही योजना राबविताना कागदपत्रांची पूर्तता केली नसतानादेखील काही महिन्यांपासून हे काम दामटण्याच्या प्रयत्न सुरू होता मात्र मागील सरपंच व अन्य जणांनी त्याला विरोध केला व सर्व अटींची पूर्ण केल्याशिवाय काम सुरू न करण्याचा आग्रह धरला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातल्यानंतर हे काम सुरू झाले होते मात्र हे काम करताना स्थानिक नागरिकांनी सांगितलेल्या सूचनांची कोणीही दखल घेतली नाही भूमिगत केबल घालण्यासाठी चर खोदण्यात आले आहेत त्यावर नुसती माती ढकलून देण्यात आली वास्तविक हे काम आटोपल्यानंतर त्यावर काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करणे आवश्यक होते पावसाळा तोंडावर आल्याने पुढील भूमिगत केबल वाहिन्यांचे काम करु नये असे ग्रामस्थांनी सांगितले असतानादेखील कंत्राटदाराने हे काम सुरूच ठेवले त्यामुळे चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर सर्व माती रस्त्यावर आल्याने अनेक भागात ढोपरभर चिखल झाला त्यामुळे शिरगाव भागातील नागरिकांचा संपर्क रत्नागिरीशी तुटण्याची वेळ आली यामुळे ग्रामस्थांच्यात आणखीनच संतापाचे वातावरण निर्माण झाले वेळोवेळी सांगूनही वीज महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदाराने यांनी न ऐकल्याने त्याचा परिणाम ग्रामस्थांना भोगावा लागला याबाबत माजी सरपंच मोरे मॅडम तसेच दीपक मोरे व अन्यजणांनी याबाबत हा प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातला
ग्रामस्थांनी आग्रह धरल्याने शेवटी कंत्राटदाराने बुलडोझर आणून ही माती बाजूला करण्यास सुरवात केली आहे तसेच पाणी साचल्यामुळे तेथे त्या भागातले मोरीही फोडावी लागली आहे त्यानंतरच पाण्याचा निचरा झाला आहे असे असले तरी अनेक भागात अजून चिखलाचे साम्राज्य आहेरस्त्यावरील हा चिखल बाजूला व्हावा व पूर्वरत परिस्थिती व्हावी यासाठी स्वतः ग्रामस्थही मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत येथील ग्रामस्थांवर अशी परिस्थिती असतानाकेवळ ग्रामसेवकांना न पाठवता शिरगाव सरपंचांनी याठिकाणी तातडीने येऊन दखल घ्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button