
रिळचे प्रगतशील शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांना राज्य शासनाचा २०१८ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
रत्नागिरी तालुक्यातील रिळचे शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांना राज्य शासनाचा २०१८ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला. गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रात त्यांनी वैविध्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्यस्तरीय भातपिक स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला होता.
मिलिंद वैद्य यांनी प्रामुख्याने भातशेतीत संशोधन करून चांगले उत्पादन घेतले आहे. दरवर्षी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करून संतुलित पद्धतीने सेंद्रीय आणि रासायनिक खतांचा वापर करून पिक व्यवस्थापनावर त्यांनी भर दिला होता. कोकणातील शेतकाऱ्यांना चांगल्या दर्जाचे भातपीक उपलब्ध व्हावे, यासाठी ते प्रयत्न करत आले आहेत
www.konkantoday.com