रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांचा संप पहिल्या दिवशी यशस्वी

सरकारच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बँक कर्मचारी व अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप आज पहिल्या दिवशी रत्नागिरीत पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी केला.
कोरोनाच्या फैलावामुळे संघटनांनी निदर्शने केली नाहीत. बँक बचाओ देश बचाओचे फलक आज सर्व बँकांच्या आवारात लावण्यात आले होते. केंद्र सरकारने दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बैंक युनियन्स या बँकिंग उद्योगातील नऊ संघटनाच्या शिखर संघटनेने १५ व १६ मार्च रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button