नाणार रिफायनरी प्रकल्पावरून विरोधक देखील सरसावले, लोकांचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू प्रकल्प विरोधक नेते अशोक वालम यांचा इशारा

नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी असा प्रकल्प समर्थक मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत प्रकल्प समर्थक यांनी नुकतीच जितेंद्र आव्हाड यांची भेट घेत ८५०० हजार एकर जमिनीधारकांची प्रकल्पाला संमती असल्याचा दावा केला. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.
या साऱ्याबाबत रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम हे देखील विरोधासाठी पुढे सरसावले आहेत, ‘हा प्रकल्प रद्द झाला आहे.आम्ही सध्या स्थानिकांच्या जमिनी कुणी खरेदी केल्या याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करत आहोत. त्यामुळे समर्थक प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. पण, यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू असं अशोक वालम यांनी स्पष्ट केलं आहे. परिणामी, विरोधक देखील आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. .भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि नाणारचा प्रश्न मार्गी लागेल असं विधान रविवारी केलं होतं. त्यावर देखील वालम यांनी टीका केली आहे. त्यांना सध्या काहीच काम नाहीय त्यामुळे जठार अशी विधानं करत आहेत. नाणार विरोधकांमुळे काय होऊ शकतं हे जठारांनी देवगड येथे अनुभवलं आहे, असं देखील वालम यावेळी म्हणाले. शिवाय आम्हाला तेल शद्धीकरण कारखाना नव्हे तर प्रदुषणकारी कोणताही प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही. काजू, आंबा, करवंद, जांभूळ यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आल्यास त्याचं स्वागत करू. प्रकल्प यावेत पण ते पर्यावरणपुरक असावेत असं वालम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी समर्थक आग्रही होत असताना विरोधक देखील आता आक्रमक झाले आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button