
राज्य सरकारने कुटुंबप्रमुख म्हणून लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल भरावे
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यातच महावितरणने तीन महिन्यांचे एकत्रित पाठविलेले वीज बिल ग्राहकांना डोईजड झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कुटुंबप्रमुख म्हणून लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल भरावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे. तसेच महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या वाढिव वीज बिलाच्या निषेधार्थ सोमवार, १३जुलै रोजी राज्यभर वीज बिलांची होळी करण्याचा इशारा दिला आहे.सरकारने 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीज बिलाचा भार सरकारने उचलावा अशी मागणी सर्वांनी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी सांगितले
www.konkantoday.com