कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील बंदरावर चढ-उतारास पूर्ण बंदी

रत्नागिरी दि. २१ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हयात असणाऱ्या बंदरावर येणाऱ्या जहाजावरील खलाशी तसेच बंदरावरील अधिकारी,कर्मचारी अन्य व्यक्ती यांना बंदरावरुन जहाजामध्ये किंवा जहाजामधून बंदरावर चढउतार करण्यास प्रतिबंधाचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. सदर कायदा आपल्या जिल्हयात लागू करण्यात येत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयामध्ये जेएसडब्लू पोर्ट, जयगड, चौगुले लावगण शिपयार्ड, जयगड, आंग्रे पोर्ट, जयगड, कोकण एलएनजी प्रा.लि. दाभोड, फिनोलेक्स पोर्ट, रत्नागिरी रनपार, इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टीक प्रा.लि. बाणकोट, अशापूरा माईनकेम, केळशी तसेच जिल्हयातील अन्य बंदरावर परदेशातून कच्चा माल घेवून येणाऱ्या जहाजावर परदेशी अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने रोग प्रतिबंधत्मक कायदा 1897 अन्वये 20 मार्च 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत सदर बंदरावर येणाऱ्या जहाजावरील खलाशी तसेच बंदरावरील अधिकारी,कर्मचारी अन्य व्यक्ती यांना बंदरावरुन जहाजामध्ये किंवा जहाजामधून बंदरावर चढउतार करण्यास प्रतिबंध करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेशीत केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 141 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button