
धक्कादायक, पाच दिवसात जंतर-मंतरवर पोलिसांनी शोधले 400 रेकॉर्डवरील गुन्हेगार,
जंतर मंतरवरील आंदोलन काही समाजकंटक हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. हेच असामाजिक तत्त्व पोलिसांवर टोकदार दगडांचा वर्षाव करत होते.काही ठिकाणी काचेच्या बाटल्या मारून फेकत होते. आंदोलकांच्या आडून ते पोलीस आणि यंत्रणेला लक्ष करत होते. पोलिसांनी चेहरा पाहून ओळख पटवणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फेशियल रिकॉग्निशन सिस्टिमचा (FRS) वापर करून गेल्या पाच दिवसांत 400 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख पटवली. तर त्यातील काहींची धरपकड केली. जंतरमंतरवर आणि मध्य दिल्लीत पोलिसांनी FRS बसवले आहेत. गेल्या पाच दिवसात या तंत्रज्ञानाच्या मदतीने जंतर मंतर परिसर आणि आजूबाजूच्या क्षेत्रात अशा गुन्हेगारांची ओळख पटवली गेली.400 जण रेकॉर्डवरील गुन्हेगार
आंदोलकांच्या आडून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या 400 जणांचा गुन्हेगारीशी संबंधित रेकॉर्डही पोलिसांच्या हाती आहे. साहिल, यश, रुबल आणि असे अनेक गुन्हे नोंदवलेले, गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार समोर आलेले आहेत. त्यातील काही जण अट्टल गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे. 20 जुलै रोजी नवी दिल्ली जिल्ह्यात हिंसा भडकली होती. पोलिसांच्या वाहनांसह सार्वजनिक वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले होते. सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तांचे नुकसान करण्यात आले होते. तर पोलिसांवर अणकुचीदार दगडं आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. या सर्व घटनांमध्ये या 400 जणांचा किती हात आहे याचा तपास पोलीस करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणेने सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील उपलब्ध व्हिडिओ आणि छायाचित्रांआधारे काही गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. 20 जुलैच्या हिंसेत ही मंडळी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहेकॉक्रोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. या आंदोलनात आणि आंदोलकांमध्ये काही गुन्हेगारीवृत्तीचे लोक शिरल्याचाही आरोप होत आहे. पोलीस डिजिटल पुराव्यांआधारे त्यांची ओळख पटवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर करण्यात येत आहे. फेशियल रिकॉग्निशन सिस्टिममुळे आता पोलिसांचे काम सोपे झाले आहे. त्यांच्याकडे उपलब्ध डेटाबेसशी पोलीस स्टेशनमधील गुन्हेगारांचा पडताळा करण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत 400 हून अधिक लोकांची ओळख पटवली गेली आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. या मंडळींमुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होत आहे.




