सहलीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांचा आधार;


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा सहल बस थांबवण्यासाठी जागा न सापडल्याने चिंताग्रस्त झालेल्या शिक्षकांना अखेर लोटे महामार्ग पोलीस केंद्रात सुरक्षित आश्रय मिळाला.धुळे जिल्ह्यातील बोरिस तालुक्यातील सौ. सावित्रीबाई शिवाजीराव देवरे कन्या शाळेतील ४१ विद्यार्थी आणि शिक्षकांना रात्री जवळपास दहा वाजता जेवणासाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे हा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ मदत करत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात जेवणासाठी व्यवस्था करून दिली.
सहल मुंबईच्या दिशेने जात असताना चिपळूण तालुका ओलांडल्यानंतर खेड तालुक्यात प्रवेश झाला. त्या वेळी महामार्गावर अंधार आणि शांतता असल्याने शिक्षकांनी बस कुठे थांबवावी याचा विचार सुरू केला होता. लोटे महामार्ग पोलीस केंद्र दिसताच त्यांनी बस तिथे उभी केली आणि विद्यार्थ्यांना काही वेळ बसू देण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी ही विनंती त्वरित मान्य केली आणि कोणतीही अडचण न आणता विद्यार्थ्यांना व्यवस्थित बसण्याची जागा दाखवली.
उपनिरीक्षक इर्शाद बेग तसेच अधिकारी काशिनाथ रामपूरकर, बळीराम शिंदे, संदीप शिंदे, संतोष राठोड, सोमनाथ आव्हाड, बाबुराव खोदल व अनिल म्हसकर यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ जागा करून दिली. त्यांनी मुलींच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन शांत आणि आरामदायी वातावरण निर्माण केले. शिक्षकांनी सांगितले,
‘परिस्थिती पाहता आम्हाला सर्वात विश्वास वाटला तो पोलिसांवरच. येथे थांबणे हा योग्य निर्णय होता.’
विद्यार्थ्यांनीही पोलिसांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button