मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या!

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्यात्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत या मतदार यादीवर हरकती-सूचना देता येणार आहेत. ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत वा मतदार यादीतून वगळली गेली आहेत त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मिळणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे वेळापत्रक नुकतेच आयोगाने जाहीर केले. त्यानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यता दिली. तसेच ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

हरकती व सूचना या ठिकाणी

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाच्या पत्त्याची यादी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mcgm.gov.in >;;>;; नवीन >;;>;; विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम – २०२६ >;;>;; दावे व हरकती >;;>;; विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालय पत्त्याची यादी या पथदर्शकान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सुनावणीसाठीसाठी बोलवणार

ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत आणि ज्यांनी दावे व हरकती दाखल केले आहेत अशा मतदारांना ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलवण्यात येणार आहे. सुनावणीद्वारे दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. तसेच ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे.

ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत असे मतदार ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करून मतदार यादीत नावे नोंदवू शकतात.

नव्याने नावनोंदणीचीही सोय

१ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेल्यांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करून मतदार यादीत नावे नोंदवता येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button