
शासनाच्या निर्णयाचा दणका, रत्नागिरीतील ११ शाळांचे अनुदान कायमस्वरूपी बंद
गेल्या अनेक वर्षापासून सरकारी अनुदानाची स्वप्ने पाहाणार्या आणि वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणार्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य शासनाने मोठा दणका दिला आहे. वारंवार होणार्या मूल्यांकन प्रक्रियेत सलग अपात्र ठरल्याने कोल्हापूर विभागातील ८५ शाळा आणि ४८ तुकड्यांचे वेतन अनुदान कायमस्वरूपी बंद करण्याचा कठोर निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ११ शाळा आणि २ तुकड्यांचा समावेश असून, आता या शैक्षणिक संस्थांना सरकारी तिजोरीवर अवलंबून न राहता स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरच स्वतःचा गाडा हाकावा लागणार आहे.
www.konkantoday.com




