मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव येथे ठाणे दापोली बसची रिक्षाला धडक , अपघात -तीन ठार

मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव इथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ७ एप्रिल रविवारी रोजी ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे.घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांसोबत तात्काळ मदत कार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे आणि आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button