
त्यामुळे विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीकाकरणार नाही-नीतेश राणे
अपक्ष उमेदवार नवाज खानी यांना मी उमेदवारी अर्ज भरायला लावला, असे कोणी म्हणत असेल तर संदेश पारकर यांनाही त्या चौकटीत बसवायला पाहिजे. नीतेश राणे यांनी कोणाकोणाला अर्ज भरायला लावला आहे, असा संशयाचा काटा फिरवायचा असेल तर असंख्य लोकांवर तो फिरेलतेव्हा माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी या विषयावर कमीच बोलावे,” असा इशारा भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नीतेश राणे यांनी दिला.श्री. राणे हे आज येथे अर्ज छाननीसाठी आले होते. त्या वेळी ते म्हणाले, ”दोनवेळा आमदार झालो. विरोधकांना कधीही कमी लेखत नाही, किंबहुना त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीकाटिप्पणी करत नाही. जे उत्तर द्यायचे आहे, ते मतदार देतील आणि ते निकालादिवशी मतपेटीत दिसेल. निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या ज्या काही अपेक्षा, नियम असतात, त्यानुसार लढत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर सर्वांचा विश्वास असल्यामुळे ही निवडणूक संविधानांतर्गत आणि त्याचा मान ठेवून सर्वजण लढतो आहोत. ही निवडणूक कणकवली, देवगड, वैभववाडीची जनता लढते आहे. प्रत्येकाच्या घरातला सदस्य म्हणून गेली दहा वर्षे वावरलो आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीकाकरणार नाही.’