पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीत जयेश मंगल कार्यालयात उपस्थित राहून प्राण प्रतिष्ठिस्थापणेचा अयोध्येतील अभूतपूर्व सोहळा रत्नागिरीकरासहित लाईव्ह पाहिला


असंख्य भारतीयांचे स्वप्न साकार होत असून रामभक्तांसाठी आजचा दिवस उत्सवाचा असणार आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु असताना तो अभूतपूर्व सोहळा महाराष्ट्रचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या समस्त जनतेसमवेत जयेश मंगल कार्यालय रत्नागिरी येथे लाईव्ह पाहिला.भारतासह जगामध्ये हा सोहळा पाहिला जात आहे.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी अयोध्येतील हा अभूतपूर्व सोहळा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवता यावा ह्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी जयेश मंगल कार्यालय रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले होते. तो सोहळा त्यांनी जनते सोबत उपस्थित राहून पाहिला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तिकीरण पुजार,ऍड. राजशेखर मलुष्टे, बाळू साळवी, किशोर मोरे, अलिमिया काझी, प्रशांत सुर्वे,दीपक पवार, अभिजित गोडबोले,महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे,स्मितलताई पावसकर, वैभवी खेडेकर, रत्नागिरी मुख्यधिकारी तुषार बाबर यांच्या सह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button