
रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथे रस्त्याकडेला तोल जावून पडल्याने महिलेचा मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथे रस्त्याकडेला तोल जावून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जिल्हा रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारास घडली. सुजाता अनंत शेलार (५५, रा. बसणी, तेली वाडी रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. सुजाता या २५ एप्रिल २०२५ रोजी बसणी तेली वाडी येथून चालत जात असताना त्यांच्या बाजूने वेगवान कार गेली. यामुळे सुजाता या रस्त्याकडेला तोल जावून पडल्या. यावेळी त्यांना दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.www.konkantoday.com