
बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील परटवणे नाका येथे बेशुद्धावस्थेत आढळेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पवन अनिल गायकवाड (३३, रा. बाणखिंड, शिरगाव) असे मृताचे नाव आहे. पवन याच्यावर मागील २ दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय व यानंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन गायकवाड हा ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घरातून कामासाठी बाहेर पडला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास तो परटवणे नाका येथे बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी प्रथम जिल्हा रूग्णालय व नंतर रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. २ एप्रिल रोजी सकाळी ३ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे करण्यात आली.www.konkantoday.com