
नवनिर्मिती सामाजिक संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
नवनिर्मिती सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी दत्ताराम खातु, कार्याध्यक्षपदी जमूरत अलजी, तर सचिवपदी मुजम्मिल काझी, सहसचिव पदी कौस्तुभ धनावडे, ओंकार वीरकर यांची खजिनदार पदी निवड

◾ उपाध्यक्षपदावर
🛑 नवनिर्मिती सामाजिक संघटनेचा 23 विभागांत कामकाजासाठी 50 कार्यकर्त्यांची नियुक्ती
ग्रामीण भागात काम करत असलेल्या नवनिर्मिती फाउंडेशनची उप कमिटी म्हणून आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यकारी निवड बैठकीमध्ये जाहीर करण्यात आली.
– नवनिर्मिती सामाजिक संघटनेच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीत दत्ताराम खातु यांची संघटनेच्या अध्यक्षपदी, जमूरत अलजी यांची कार्याध्यक्षपदी, मुजम्मिल काझी यांची सचिवपदी, तर कौस्तुभ धनावडे यांची सहसचिवपदी, खजिनदार ओंकार वीरकर, कार्यवाह अभिजित किंजले यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे या संघटनेच्या उपाध्यक्ष पदांसाठी रवींद्र सांडीम, उपाध्यक्ष मानसकोंड : सुहास किंजळे,उपाध्यक्ष आंबेड निसार केळकर,उपाध्यक्ष परचुरी रमेश मेस्त्री,उपाध्यक्ष ओझरखोल अमोल वाडकर यांची निवड करण्यात आली आहे.तर कार्यकरणी सदस्य पदी निलेश जाधव,तैमुर अल्जी
यासीन सनगे,अतिश पाटणे
पंकज मोहिते,संतोष सांडीम
ओंकार सांडीम,इरफान नेवरेकर
दीपक डावल,निमंत्रित सदस्य
सिकंदर फरास, शकील डिंगनकर, सल्लागार पदी युयुस्तु आरते यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचे आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
👉 संघटनेचे नवे अध्यक्ष दत्ताराम खातु यांनी सांगितले की, “नवनिर्मिती संघटना ही केवळ नावापुरती नव्हे, तर खऱ्या अर्थाने सामाजिक बदल घडवणारी संघटना ठरेल. शासनाच्या योजना गावागावात पोहोचवून ग्रामीण विकासाला नवे बळ देणे हेच आमचे ध्येय आहे.”
👉 नवनिर्मिती सामाजिक संघटनेचा 23 विभागांत कामकाजासाठी 50 कार्यकर्त्यांची नियुक्ती
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनिर्मिती सामाजिक संघटनेने आपले कामकाज अधिक विस्तारले आहे. संघटनेच्या माध्यमातून 23 विभागांत काम करण्यासाठी 50 कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम खातु यांनी सांगितले की, “नवनिर्मिती संघटना ग्रामीण जनतेच्या विकासासाठी प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. शासकीय योजना प्रत्येक गावात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”
या उपक्रमामुळे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती, रोजगार आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांमध्ये अधिक प्रभावी काम होण्यास मदत होणार असल्याचेही संघटनेचे कार्याध्यक्ष जमूरत अलजी यांनी सांगितले.
संघटनेच्या नव्या पथकाच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात विकासाची गती वाढेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
👉 नवनिर्मिती सामाजिक संघटनेकडून लवकरच जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत नवनिर्मिती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लवकरच जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम खातु यांनी सांगितले की, “ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेता यावी, या हेतूने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे.”
संघटनेचे कार्याध्यक्ष जमूरत अलजी यांनी माहिती दिली की, या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, औषधोपचार, रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी आणि विविध आरोग्य विषयक सल्ला दिला जाणार आहे.
या उपक्रमाद्वारे नवनिर्मिती संघटनेने ग्रामीण भागात आरोग्य जनजागृतीचा एक नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी संस्थेचे सचिव राजेश आंबेकर, ज्येष्ठ सदस्य सलाउद्दीन बोट, ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सलीम सय्यद, संचालिका नाझिमा बांगी, संघटनेचे सल्लागार युयूस्तू आरते, अण्णा बेर्डे,
बैठकीस संघटनेचे अनेक सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीस संस्थेचे सचिव राजेश आंबेकर, ज्येष्ठ सदस्य सलाउद्दीन बोट आणि डॉक्टर सलीम सय्यद, संचालिका नाझिमा बांगी, सल्लागार युयुत्सु आरते, अण्णा बेर्डे यांच्यासह निसार केळकर, सुहास किंजळे, ओंकार विरकर, रवींद्र सांडीम, संतोष सांडीम, ओंकार सांडीम, शकील डिंगणकर, तैमुर अलजी, वसंत मेस्त्री, मोहिद्दीन मयेर, दिनेश टाकळे, यासीन सनगे, कासम मयेर, अविनाश निंगावले, महमद कापडे, ताजुद्दीन आंबेडकर, मुस्तफा कापडे, दीपक डावल, प्रथमेश सुकम, नरेश किंजळे, निलेश जाधव, कौस्तुभ धनावडे, रमेश मेस्त्री, इरफान नेवरेकर, अमोल वाडकर, सौ सरिता आंबेकर, अभिजीत किंजळे, मुझम्मिल काझी, संघटनेचे अनेक सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्या नव्या पथकाच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात विकासाची गती वाढेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.




