रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील खून प्रकरणातील आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी


*रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील सिताराम वीरच्या खूनात संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयातून जयगड पोलिसांनी दुर्वासचे वडिल दर्शन पाटील यांना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यापूर्वी या ट्रिपल मर्डर प्रकरणात जयगड पोलिस व शहर पोलिसांनी दुर्वास पाटील, विश्वास पवार, निलेश भिंगार्डे,सुशांत नरळकर या चार संशयितांना अटक केली आहे. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे या चारही जणांना पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात आले असता न्यायालयाने दुर्वास पाटील,सुशांत नरळकर,विश्वास पवार या तिघांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली. तर निलेश भिंगार्डेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान,सिताराम विर खून प्रकरणाचा तपास करताना जयगड पोलिसांना त्याच्या खूनात दुर्वासचे वडिल दर्शन पाटील यांचाही सहभाग तसेच या गुन्ह्यात संशयितांना मदत केल्याचा संशय आला. त्यावरुन जयगड पोलिसांनी दर्शन पाटीलला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button