
माहिती अधिकारात विचारलेल्या ३९ पत्रांपैकी केवळ ९ पत्रांना उत्तर, माजी आमदार विनय नातू यांचा आरोप.
माहिती अधिकारातील पत्रांना उत्तरे देण्यासाठी दीड महिना कालावधी लागत असेल तर यामागे काहीतरी गडबडीचा मामला असावा, अशी शंका करून जिल्हाधिकार्यांचा जिल्हा प्रशासनावर अंकुश नसेल तर कोकण आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना डॉ. नातू म्हणाले, माहिती अधिकारात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध नियोजन विभागाची माहिती मिळविण्यासाठ ३ एप्रिलला पत्र पाठवले व नंतर २९ एप्रिलला स्मरणपत्र पाठवले.
५ मे पर्यंत पत्रव्यवहार करताना ३९ पत्रे लिहिली व विविध योजनांची माहिती माझ्या अभ्यासासाठ मिळविली. यापैकी ९ विभागांच पत्रांना उत्तरे मिळाली. मात्र दीड महिना उलटूनही ३० विभागांची माहिती आलीच नाही. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीचे पत्र पोहोचूनसुद्धा दीड महिने उत्तर देणे इतका मोठा गडबडीचा मामला असावा, असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडला आहे. तसेच १९ जून रोजी एकूण २२ कार्यालयात माहितीच्या अधिकारात २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहिती मागविली असता त्यालाही उशीर झाला. याचाच अर्धे जिल्हा प्रशासनावर जिल्हाधिकार्यांचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com