
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गावांच्या फलकावरील चुकीच्या नावांनी ग्रामस्थ संतप्त.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने आधीच ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यातच आता बसविण्यात आलेल्या फलकावरील गावांच्या नावातील चुकीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संगमेश्वर तालुक्यातील महसूली नोंदीनुसार गावाचे नाव निढळेवाडी असतानाही फलकावर निधळेवाडी असे चुकीच नाव लिहिले गेले. त्याचप्रमाणे गावमळा या गावाचे नाव गावमाला असे चुकीच्या प्रकारे फलकावर लिहिले आहे.हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.www.konkantoday.com