मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी टॅप ठरतोय अपघाताचे ठिकाण.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अनब आरामदायी झाला असला तरी अपघात घडतच आहेत. गेल्या ४ महिन्यात कशेडी टॅप हद्दीत १० अपघातांची नोंद झाली आहे. यात चौघांना हकनाक प्राण गमवावा लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ४ महिन्यात ३,१९० बेदरकार वाहनचालक कशेडी वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात अडकले. त्यांच्याकडून ३७ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कशेडी टॅप हद्दीत अपघातांचे प्रमाण घटले आहे. कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून वेगवान प्रवास होत असल्याने वाहनचालक बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती देत आहेत. बोगद्यातून बेदकारपणे मार्गस्थ होणार्‍या वाहनचालकांमध्ये प्रसंगी अपघात घडत आहेत. कशेडीच्या दोन्ही बोगद्याच्या निर्मितीनंतर प्राणांतिक अपघातात झालेली घट ही वाहनचालकांसह वाहतूक पोलीस मदत केंद्रासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. पुरेशा झोपेच्या अभावामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. कशेडी टॅप हद्दीत १० अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात चौघांवर नियतीने झडप घातली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button