
भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक कडून क्षेपणास्त्र हल्ला केल्याने खेडवासीयांकडून आनंद.
भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक कडून क्षेपणास्त्र हल्ला केला.पहेलगाम हल्ल्याचा बदला आज घेण्यात आला. ज्याप्रमाणे भारतीय महिलांचा सिंदूर मिटवण्यात आला. त्याचे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दिले. पाकिस्तानला पूर्ण धडा शिकवण्याचं विडा भारतीय सरकारने उचललेला आहे त्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी समस्त खेडवासीयांच्या वतीने आज फटाके फोडून आणि पेढे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.वैभव खेडेकर,सोबत शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे,नंदू साळवी,स्वप्नील सैतावडेकर,आकाश पिंपळकर,पियुष माने,प्रशांत बारटक्के, अतुल शेठ,राकेश मोरे, भूषण कारेकर,अक्षय जांभुळकर,संजय आखाडे आणि समस्त खेड वासिय उपस्थित होते.