रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २१४ ग्रामपंचायती आता क्षयरोग मुक्त.

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी २१४ ग्रामपंचायती आता क्षयरोग मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरल्या आहेतया ग्रामपंचायतींचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आखले असून, रत्नागिरी जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे.

त्यासाठी वार्षिक एक हजार लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३० क्षयरोग संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या थुंकी नमुन्याची तपासणी करण्यात आली.तसेच १०० टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेला असावा, असे विविध निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत.जिल्ह्यात शोधमोहिमेत आढळले ५१० क्षयरुग्णक्षयरुग्ण जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ३११ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ३ हजार ३५५ संशयित क्षयरुग्ण शोधण्यात आले. त्यांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली तसेच एक्स-रे काढण्यात आले. त्यामध्ये ४२ क्षयरुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण ५१० क्षयरुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button