
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारात पाच सीसीटीव्ही कार्यान्वित.
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील झालेल्या प्रकरणानंतर राज्य परिवहन महामंडळ सतर्क झाले आहे. आगारात सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या ५ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. अजून ५ सीसीटीव्हीची मागणी व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांनी सांगितले.
प्रत्येक आगारात सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे. यासाठी मुंबईतून राष्ट्रीय परिवहन मंडळाचे सुरक्षा पथक पाहणी करत असल्याचे समोर आले आहे. हे पथक दापोली येथूनही पाहणी करून गेले आहे. वर्कशॉप व इतर काही भागातही सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.www.konkantoday.com