आपली न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणूनच शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही – संजय राऊत.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी 15 कोटींची रोकड सापडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले.” या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरन्यायाधीशांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. व्हिडीओ देखील त्यांनी टाकला आहे. पण हे कुणाच्या कार्यकाळात होतंय. न खाऊंगा न खाने दूँगा म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात एका न्यायधीशाच्या घरात 15 कोटींची रोकड मिळतेय.

ही एका दिवसाची कमाई असल्याचे बोलले जातेय. दिल्लीत असे बोलतायत लोकं. शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात न्याय का मिळाला नाही हे त्याचे कारण आहे. संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे. आमच्या ज्या 40 आमदारांनी पक्ष सोडला त्यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं व घटनाबाह्य सरकारला पाठिंबा दिला. याचं कारण हेच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button