
रत्नागिरी वासीयांना सोमवारी पाणी नाही.
रत्नागिरी नगरपरिषद कार्यक्षेत्रात सोमवार दि.३०/१२/२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभाग योजनेच्या प्रतिबंधात्मक देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नगरपरिषद रत्नागिरी यांनी केले आहे.