
रत्नागिरीत उबाठा गटातील संध्या कोसुमकर, गीता शिंदे यांचा उबाठात निष्ठावंताना डावलल्याने शेकडो महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा रत्नागिरीत शिवसेनेला मोठा धक्का, उबाठा गटाच्या शेकडो महिलांचा उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश….
रत्नागिरी, आज रत्नागिरी, पाली येथे शेकडो महिलांनी उबाठा पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.उबाठा पक्षातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल न घेतल्याने आणि महिलांना योग्य मान देण्यात आल्या नाही, या कारणांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उबाठा आता आयारामानचा पक्ष बनला आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला.शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या महिलांमध्ये उबाठा रत्नागिरी उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुमकर, विभाग प्रमुख गीता शिंदे यांच्यासह अनेक महिलांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत यांनी या महिलांचे शिवसेनेत स्वागत केले आणि त्यांना आश्वासन दिले की, शिवसेना महिलांना सन्मान देते आणि त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देते.या प्रसंगी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, “शिवसेना ही महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवा, शिवसेना आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल.” यावेळी उबाठा उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुमकर, विभाग प्रमुख गीता शिंदे यांस शुभांगी जोशी, शिल्पा दुडे, प्रतिभा उतेकर, शलाखा मांडवकर, रुचिता डेपसे, रोहिणी नलावडे श्रद्धा झगडे रुपाली धामनस्कर, राजश्री सावंत, श्वेता फाळके, दीपाली जाधव, धनश्री कुष्टे, संस्कृती नागवेकर, संचिता कदम, आरती सावंत, शुभांगी पवार, वैशाली वालम, मुमताज मस्कर, आसिया साखरकर, हनिफा मिरकर, आरिफा पावसकर, जुबेदा बुडिए, साखिफ पावसकर, रुक्साना चाहूस, रेश्मा बोरनकर, रिया कोसुमकर, प्रियांका कोसुमकर, प्रियांका फडतडे, आरोही पवार, फातिमा मिरकर,हालिमा मस्तान, नसीमा मस्तान, बक्षूनिसा बुडिए,निलीफर फणसोपकर, मिसबा उतेकर, पर्विणा दरवेश, तस्सिया मुस्कान मस्कर, सोना गवळी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. उबाठा पक्षाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.