नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार-गृहमंत्री अमित शाह.

बॉम्बे नको मुंबई नाव हवं आहे ही मागणी ज्यावेळी केली गेली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवी ही मागणी करणारा होतो. त्यावेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की मुंबईच हवं.नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की याला प्रचंड विरोध होईल, मात्र आम्ही तरी देखील हा निर्णय घेणार आहोत”, असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होतेअमित शाह म्हणाले, माझं सांगणं आहे की, किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला. जर तुम्ही हे केलं नाही तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धश्रम काढण्याची वेळ येईल. कारण जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही तर त्यांचं आजोबाशी नातं जोडणार कसं? सध्या घरात आई वडिलांना वेळ नसतो वेळ केवळ आजी आजोबांना असतो त्यामुळें मातृभाषा येणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रात कोणत्याही प्रकरची मागणी न करता केवळ काम करणारा समाज म्हणजे पारसी समाज आहे. या समाजाने फक्त कोणत्याही मागण्या न करता समाजाची सेवा केल्याच पाहिला मिळत आहे. मग ते टाटा असोत की होमी भाभा त्यांनी मोठं योगदान केल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button