न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना लगाम घालण्याची गरज-उद्योगमंत्री उदय सामंत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी निशाणा साधला. ‘न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी जनता उघड्या डोळ्यांने पाहात आहे,’ या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देत उदय सामंत यांनी न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना लगाम घालण्याची गरज व्यक्त केली.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा’च्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय वकील परिषदे’त ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी न्यायालयाचा अवमान करण्याची फॅशन रूढ होत चालली आहे. न्यायमूर्तींनाच न्याय देण्याबाबत सल्ले देणारे महाभाग निर्माण झाले असून, त्याला लगाम घालण्याची गरज आहे. न्यायालयाच्या निकालावर शंका उपस्थित करून न्यायव्यवस्थेची बदनामी करणाऱ्या राजकारण्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.’तसेच, ‘आपल्या बाजूने निकाल लागल्यावर न्यायालय चांगले आणि विरोधात निकाल गेल्यावर न्यायालयावर शंका उपस्थित करण्याचे काम राजकारणी करत आहेत. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य जपण्याऐवजी त्याची बदनामी करणाऱ्यांना जाब विचारला गेला पाहिजे,’ असेही सामंत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button