
कोकणात केरोसीनमुक्त शहर होण्याचा मान रत्नागिरी व खेडला
महाराष्ट्र शासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या केरोसीनमुक्त योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड शहराचा समावेश झाला आहे. येथील एकाही केरोसिन धारकांकडून तहसील कार्यालयाकडे हमी पत्र प्राप्त झालेले नसल्याने या शहरांना करण्यात येणारा केरोसीनचा पुरवठा बंद झाला आहे. शासनाच्या उज्ज्वला योजना लागू झाल्यापासून या योजनेचा लाभ अनेकांनी घेतला होता. त्यामुळे केरोसिन बंद झाले आहे. उर्वरित नगर परिषदांमध्ये केरोसीनचा वापर कायमचा बंद करण्यासाठी पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.