
अर्जुना कालव्याचे काम रखडले, अपूर्ण कामामुळे शेतकर्यांचे नुकसान
पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्द होवूनही पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढीसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेले २ वर्षे रखडले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता, पाटबंधारे बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी या कामांकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.अर्जुना प्रकल्प हा जिल्ह्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून या धरणात पाण्याचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. मात्र कालव्याची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने परिसरातील शेतकरी धरणाच्या पाण्यापासून आजही वंचित आहे. www.konkantoday.com