रत्नागिरी शहरातील प्रादेशिक रुग्णालयातील रुग्णाचा आकस्मित मृत्यू

रत्नागिरी शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात असलेल्या मिरज येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शनिवार 4 मे रोजी सायंकाळी 6.14 वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.विनय मोहन जुगुल (28,रा.मिरज,सांगली) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या मनोरुग्ण तरुणाचे नाव आहे. विनयला काही दिवसांपूर्वी मिरज शहर पोलिस ठाण्यामार्फत येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवार 4 मे रोजी सायंकाळी 6 वा तेथील मनोरुग्णांना जेवण पुरवण्यात आले होते. त्यावेळी जेवत असताना विनय अचानकपणे बेशुध्द झाला. त्याला शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button