
रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागाने मुद्रांक शुल्कातून १५९ कोटींचा महसूल मिळविला
रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागाची या वर्षाची आर्थिक उलाढाल आता १५९.७७ कोटी इतकी झाली आहे.जिल्ह्याला मिळालेल्या इष्टांकाच्या तुलनेत या विभागाने ९१ टक्क्यांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क वसूल केले आहे. यामध्येही रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण या तीन तालुक्यातून सर्वात जास्त उत्पन्न मिळाले आहे.गेल्या आर्थिक वर्षात मार्च २०२३ ते मार्च २०२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याला मुद्रांक नोंदणी विभागाला १७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्येही रत्नागिरी तालुक्याला ५४.३७, दापोलीसाठी ३४.६६, चिपळूण तालुक्याला २४.१३ करोडचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या चार तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये मात्र कमी कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.www.konkantoday.com