
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील गांधारेश्वर पुलाची अवस्था बिकट
_चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील गांधारेश्वर पुलाची अवस्था फारच बिकट झाली आहे. या पुलावरील डांबराचा थर पूर्ण निघून गेलेला आहे.त्याखालील सिमेंट स्लॅबलाही खड्डे पडले आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन या पुलाचे बांधकाम लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष व खडपोलीचे संतोष कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.गांधारेश्वर पूल बांधल्यापासून या पुलावर विजेच्या दिव्यांचीही व्यवस्था केलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पालिकेकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले. मात्र हा पूल आमच्याकडे अद्याप हस्तांतरित झालेला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने पूल हस्तांतरित केलेल्या कागदपत्रांची नक्कल प्रत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.www.konkantoday.com