
भरावामुळे व नागपूर महामार्ग कामामुळे शेतीत जाण्याचा शेतकर्यांचा मार्ग बंद
मिर्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली, साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची माती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या महिन्यात सुरू करून अपूर्ण ठेवून बंद करण्यात आल्याने तेथे मोठी खोल दरी सारखी परिस्थिती झाल्याने स्थानिक शेतकर्यांना त्यांच्या शेत जमिनीत जाण्यायेण्याचा मार्ग बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांना महिनाभर त्रास सहन करावा लागत आहे.रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नेमलेल्या ठेकेदार कंपनीने साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची माती खणण्याचे काम गेल्या महिन्यात सुरू केले. मात्र हे काम अपूर्ण ठेवून बंद केल्याने तेथे १४ ते १५ फूट उंचीचा खोल दरीसारखा भाग या ठिकाणी तयार झाला. यामुळे शेतकर्यांना त्यांच्या शेती, बागायती शमिनीत जाण्यायेण्याचा मार्गच बंद झालेला असल्याने त्यांची ऐन हंगामातील शेतीची कामे थांबून नुकसान होत आहे. www.konkantoday.com