रत्नागिरी न.प.चा भुयारी गटार प्रस्ताव बारगळला

रत्नागिरी न.प.चा भुयारी गटार प्रस्ताव बारगळला रत्नागिरी शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना मुलभूत प्रश्‍नांकडे मात्र सर्वच राजकीय पक्षानी डोळेझाक केली आहे. रत्नागिरी शहरातील विविध गटारे उघडी आहेत. आता अनेक ठिकाणी त्यावर कॉंक्रीटीकरणाची कामेही सुरू आहेत. पण अनेक उघडी गटारे नगर परिषदेने डास पैदास केंद्र सुरू केले आहे की काय, अशी शंका येते. सुमारे २२-२३ वर्षापासून प्रतीक्षेत असलेली भुयारी गटार योजना मात्र कागदावरच राहिली आहे. त्यासाठीचा शासनाकडे पाठवण्यात आलेला १२८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.रत्नागिरी नगर परिषद येथे मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट व त्यामुळे लोकवस्ती वाढत असताना आवश्यक त्या सुविधा देण्यात खूपच मागे राहिल्याचे दिसत आहे. गेली अनेक  वर्षे शहरातील गटारे बंदिस्त करण्याचे स्वप्न लोकांना दाखवले जात आहे. पण ते पूर्ण करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला मुहूर्तच सापडला नाही. सुमारे २२-२३ वर्षाापूर्वी नगर  परिषदेवर शिवसेनेकडून विद्यमान आमदार राजन साळवी रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले होते. त्या कार्यकाळात साळवी यांनी भुयारी गटारे करण्याची संकल्पना मांडली होती. मात्र तेव्हापासून आजपर्यंत भुयारी गटारांची संकल्पनाच राहिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button