
निसर्गाला वाचविण्यासाठी राज्यातील पर्यावरणस्नेही एकत्र
आज पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून निसर्गाला वाचविण्यासाठी राज्यातील पर्यावरणस्नेही एकत्र आले आहेत.त्यांनी आता निसर्गाच्या संवर्धनासाठी आरक्षणाची मागणी केली आणि त्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. दोन दिवस पर्यावरण संवर्धनासाठी काय काय करता येईल त्यावर चर्चा करून एकूण अहवाल तयार केला जाणार आहे.टेलस ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी, महाएनजीओ आणि निवेदिता प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने जालगाव येथे पर्यावरण स्नेहींची सहविचार सभा आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन जालगाव येथे झाले. त्यावेळी सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. या वेळी टेलस संस्थेचे लोकेश बापट, महाराष्ट्र वृक्ष संवर्धनीच्या प्रिया भिडे, महाएनजीओचे शिंदे, निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे आदी उपस्थित होते. या वेळी पर्यावरणासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यात शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, बांधकाम व्यावसायिक मयूरेश शेठ, सरपंच जनार्दन आंबेकर, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी विनायक महाजन यांचा समावेश होता. www.konkantoday.com