आश्‍वासक तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषण करणार -अविनाश काळे

काही दिवसांपूर्वी अविनाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी वानर माकडांपासून होणार्‍या उपद्रवाबाबत आमरण उपोषण केलेले होते. शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेवून शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी वानर माकडांच्या उपद्रवाबाबत २० ऑक्टोबरच्या आत बैठक घेतो व यातून नक्की मार्ग काढू असे आश्‍वासन अविनाश काळे यांना दिले. यानंतर वानर माकड उपद्रव प्रश्‍नी सरकारने निर्णय घ्यावा यासाठी सुरू केलेले आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले. मात्र याचवेळी आगामी बैठकीत आश्‍वासक तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील काळेंनी दिला होता. मात्र २० तारीख उलटून २७ तारीख आली तरी बैठकीचा पत्ता नाही, त्यामुळे अविनाश काळे सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button