राजापूर मतदार संघातून आपण विधानसभा निवडणूक लढवणारच-अविनाश लाड


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार असे दंड थोपटले जात आहेत. मग कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे फिरवायचे. साखरपा लांजा राजापूर मतदार संघातून आपण विधानसभा निवडणूक लढवणारच असे करत विजयी झेंडा फडकवणार असा विश्‍वास अविनाश लाड यांनी साखरपा येथील कार्यक्रमात व्यक्त केला.
संगमेश्‍वर तालुक्यातील मुर्शी गावचे सुपुत्र कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा वाढदिवस साखरपा येथे अविनाश लाड मित्र मंडळातर्फे नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी राजन देसाई, सुरेश भायजे, युयुत्सु आर्ते, बापू शेट्ये, आबा सावंत, संजय गांधी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button