रत्नागिरीतील औद्योगिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण , तात्काळ कडक कारवाई करा,मनसेची मागणी

रत्नागिरीतील  एमआयडीसी मिरजोळे मधील औद्योगिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण व त्यावर तात्काळ कडक कारवाई  व्हावी या मागणीसाठी आज मनसे तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात
प्रदूषण नियंत्रण महामंडळ रत्नागिरीचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. राहुल मोटे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले . यावेळी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा कुवारबाव, जेके फाईल्स,  साळवी स्टाॅप परिसरातील
नागरिकांसोबत मनसे रस्त्यावर संघर्ष करेल असा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील एमआयडीसी मिरजोळे येथील अनेक मोठ्या कंपन्यांकडून प्रदूषणाबाबतचे नियम पायदळी तुडवले जात असून त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी शहर व सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत.
याप्रसंगी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. राहुल मोटे यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव , विभाग अध्यक्ष श्री. अखिल शाहू, श्री. जयेश फणसेकर , श्री. सोमनाथ पिलणकर आदी मनसे पदाधिकारी होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button