
जो माणूस स्वत: च्या मतदारसंघातून निवडून येत नाही,तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्यावर काय टीका करणार -मंत्री उदय सामंत यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
जो माणूस स्वत: च्या मतदारसंघातून निवडून येत नाही, त्याला निवडून येण्यासाठी पुण्याला जावं लागतं, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्यावर काय टीका करणार अशा शेलक्या भाषेत राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.रायगडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अमरावती हिंसाचार आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली होती.
मंत्री उदय सामंत चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता म्हणाले की, “जो माणूस स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, त्याला निवडून येण्यासाठी पुण्याला जावं लागतं, तो माणूस आपल्या साहेबांवर टीका करतोय.”
भाजप नेते चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून ते पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आले आहेत.
www.konkantoday.com